1 hour 56 minutes
Some articles contain affiliate links (marked with an asterisk *). If you click on these links and purchase products, we will receive a small commission at no extra cost to you. Your support helps to keep this site running and to continue creating useful content. Thank you for your support!
जगातले कोणतेही दु:ख, कोणतीही समस्या पहिली नसते किंवा अखेरची. प्रत्येक पुढच्याला ठेच लागलेली असते, पण मागचे कोणीच शहाणे होत नाहीत. या अर्थाने होणारी इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजेच 'गोष्ट जन्मांतरीची'. जन्मजन्मांतरी केवळ घटनाच परत परत तशाच घडतात; असे नाही तर माणसेही पुन:पुन्हा तसाच विचार करतात, तसेच शब्द बोलतात आणि त्याच त्या कृती करत राहतात. या भोवर्यात पकडूनच नियती प्रत्येक माणसाला त्याच्या गतीकडे नेत असते. अटळ नियतीला सर्वस्वी रोखणे शक्य नसले, तरी तिचा रोख बदलणे शक्य आहे असे मानणारे डॉ. विश्वामित्र या कहाणीतील व्यक्तीरेखांना विवेक विचारांची नवी दृष्टी देऊ बघतात. या अफाट विश्वात माणूस नावाचा प्राणी एकाकी असला तरी विचारशक्तीची कवचकुंडले जोपर्यंत त्याच्याजवळ आहेत, तोपर्यंत त्याला कळीकाळाचे पण भय नाही - हा प्रत्यय चार मनस्वी स्त्री-पुरुषांना अटळ पण अकल्पित घटनांच्या मालिकेतून साक्षात अनुभवाला येतो. हा अनुभव म्हणजेच 'गोष्ट जन्मांतरीची'.